भिलार : पुस्तकांचं गाव...
भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून ओळखले जाते. या गावात प्रत्येक घरात एक ग्रंथालय आहे. पुस्तकांचे गाव हे महाराष्ट्रातील भिलार येथील एक विशेष ग्रंथालय आहे जे ४ मे २०१७ रोजी उघडले गेले. या उपक्रमाची संकल्पना आणि नेतृत्वसांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केले होते आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले . या प्रकल्पामुळे भिलार हे गाव साहित्यिक केंद्रात रूपांतरित झाले आहे. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या पंक्ती ब्रीदवाक्य म्हणून घेऊन सुरू झालेलं भिलार हे भारतातील पहिलं 'पुस्तकांचं गाव'!

Comments
Post a Comment